नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दिवसभरातील कार्यक्रमांनंतर आणि कामकाजांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपसंदर्भात भाष्य केलं.
मोठी बातमी! ईडीने केली अजित पवारांच्या निकटवर्तीयावर मोठी कारवाई
“ज्या आरोपीने पोलीस खात्याचं वातावरण खराब केलं, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? चंद्रकांत दादांकडे युती सरकारच्या काळात जेव्हा महसूल खातं होतं. तेव्हा, ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते. तेव्हा तिथले आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दादांबद्दल बरंच काही सांगितलं. उद्या असाच एखादा आरोपी अजून कुणाचं तरी नाव घेईल, हे कसं चालेल?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“चंद्रकांत पाटील यांना अजून काहीही सुचत नाही. मी आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाच्या अधिवेशनात असले ठराव होताना ऐकलेले नाहीयेत की बघितलं नाहीये. तुम्हीच सांगा अशा आरोपीनं दिलेल्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा, आता हे जनतेनंच ठरवायचं,” असं ते म्हणाले.
Read Also :
- वर्षावरच्या ‘त्या’ बैठकीत काय झाले? स्वतः शरद पवारांनी केला मोठा खुलासा
- गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं
- “जास्त दिवस चालणार नाही, हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल”
- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वबळावर लढणार; भाजप कोंडी करणार?
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले