नाशिक : सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत, “काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. त्यामुळे मी त्यांना मोठे मानत नाही. तुम्ही कोण मानत असाल, तर तो तुमचा प्रश्न आहे”, अशी बोचरी टीका केली होती.
गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं
यांनतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली. यातच गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यात त्यांच्या गाडीच्या काचेचं नुकसान झालं. हा अज्ञात व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असं बोललं जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापूरमधील कार्यालयावर हल्ला चढवला आणि ते फोडलं.
नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी; मराठा कार्यकर्त्यांना अटक
यावर आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, “कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा कुणी घेऊ नये. त्यामुळे, ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दगडफेकीच्या घटनेनंतर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० ते १५ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
यांनतर पडळकर यांनी यावर प्रतिप्रश्न करताना, “पुण्यात पक्षाच्या कार्यालयाचं उद्धाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा”, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, आज संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी, अजित पवारांच्याविरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. तसेच, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी, आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
Read Also :
- वर्षावरच्या ‘त्या’ बैठकीत काय झाले? स्वतः शरद पवारांनी केला मोठा खुलासा
- “जास्त दिवस चालणार नाही, हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल”
- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वबळावर लढणार; भाजप कोंडी करणार?
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले
- “शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही” – शरद पवार