मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत राजकीय राजकारण एक वेगळ्याच वळणावर निघून गेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तर एकीकडे पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे हे काही शिवसेनेच्या नेत्यांची पक्षातून हाकालपट्टी करताहेत. तर अनेक जण सेनेला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होतांना दिसत आहे. असं असताना शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या नेहमी एकमेकांना जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
एक स्वयंशिस्त, रोखठोक गतिमान अन् दुसरा राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक
दिपाली सय्यद यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी युक्रेन रशियाचा संबंध जुळवला आहे. त्या म्हणाल्या की, शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे, तसेच न्यायालयाच्या निकालात एक जिंकतो व एक हरतो पण वेळ अजूनही गेलेली नाही शिवसेना जिंकू शकते, फक्त विषय चर्चेने संपवा. शिवसेना एक कुटुंब आहे. त्याचे विभाजन होऊ देऊ नका, असं म्हणत त्यांनी समजोता घालण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीतून लांडे-पानसरे ‘बेदखल’; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी
याआधी देखील दिपाली सय्यद यांनी अशा प्रकारे वक्तव्ये केली आहेत. दोन्ही बाजूच्या आमदार खासदारांनी प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही, वेळेच्या आगोदर आणि वेळेच्या नंतर काहीच नाही जे आहे ते वेळेवर अजुनही वेळ गेलेली नाही, राग रूसवे विसरून कुटूंब वाचवा! चर्चा तर झालीच पाहिजे. अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. असं त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे.
“तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी सेनेतील पदाचा राजीनामा दिले आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी देखील नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांचा विविध ठिकाणी जाहीर सभा होत असून ते बंडखोर आमदारांवर तुटून पडताना दिसत आहेत. तर बंडखोर आमदार देखील आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देतांना दिसत आहेत.
Read also
- “जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव..;” अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्या
- तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटणार का? कांदेंवर दानवेंचा हल्लाबोल
- महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’..; रोहित पवारांच्या अजित दादांना हटके शुभेच्छा
- “शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”
- नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने