नाशिक : नाशिक मधील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये स्वप्नील शिंदे या शिकाऊ डॉक्टरचा मृत्यू झाला असून, हा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात? यासंदर्भात आता राज्यस्तरावर समितीच्या मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा, शालेय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख केली आहे. रॅगिंगमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पालकांचं म्हणणं असून, महाविद्यालय प्रतिनिधींचं मत वेगळं आहे, त्यामुळे या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ले गंभीर; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र…
दरम्यान, मृत स्वप्निलच्या कुटुंबीयांनी कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप केला असून, रॅगिंगमुळेच घातपात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॉलेजमधील २ मुलींवर आरोप करत, त्यांनी कॉलेज आणि या २ मुलींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र कॉलेजकडून आरोपांच खंडन करण्यात आलं असून, स्वप्नीलवर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू होते,” असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या याच भूमिकेवर स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.
“राज्यातून ४० मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही!”, उदय सामंतांचा भाजपवर हल्लाबोल
स्वप्निलच्या कुटुंबीयांनी, दोषींवर पोलीस कारवाई केली जात नाही, तोवर मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. स्वप्निलच्या वडिलांनी, “आपल्या मुलाच्या हुषारीचा काही जणांना अतिशय राग होता आणि त्यातूनच या २ विद्यार्थिनींनी त्याचा छळ सुरू केला,” असा आरोप केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, 6 महिन्यांपूर्वीही या २ मुलींच्या छळामुळेच स्वप्नीलनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधेही त्याने या 2 विद्यार्थीनींनींचा उल्लेख केला होता.
ED च्या पाचव्या समन्सनंतरही देशमुख चौकशीसाठी गैरहजर! वकिलांनी सांगितलं कारण…
दुसरीकडे, स्वप्नीलच्या मृतदेहाचं नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टेम करण्यात आलं असून, यावेळी डॉक्टर असल्याने त्याचा आतेभाऊ पोस्टमार्टेम होताना आत होता. तेव्हा काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले असल्याची माहिती प्राप्त होत असून, स्वप्नीलच्या छातीवर कशाच्यातरी भयंकर आघातानं, फासळ्या तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हा मृत्यू की घातपात ? हा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…
- अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार
- ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला ‘हा’ धोका! संजय राऊत यांनी दिला इशारा
- संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान