मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून राज्यातील ४ नवनिर्वाचित खासदारांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेना नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला असून, खासदार संजय राऊत यांच्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर टीका केली आहे.
ED च्या पाचव्या समन्सनंतरही देशमुख चौकशीसाठी गैरहजर! वकिलांनी सांगितलं कारण…
“भाजपने राज्यातून ४० मंत्री केले, तरी शिवसेनेला महाराष्ट्रातून कोणी संपवू शकणार नाही! ‘जन आशीर्वाद’ यात्रेचा कसलाही परिणाम राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर होणार नाही. मुळात हि ‘जन आशीर्वाद’ यात्राच कशी सुरू झाली, हे संपूर्ण महाराष्ट्राने बीडमध्ये पाहिलचं आहे,” असा खोचक चिमटा देखील त्यांनी काढला.
उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…
तसेच, “राज्यातला करोना संपलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे सगळ्यांनीच करोना नियमांचे पालन केले पाहिजे. पंतप्रधानांचीही हीच भूमिका आहे आणि तीच भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. आता यात जर कोणी हस्तक्षेप करत असेल, तर प्रशासन त्यांचं काम करेल,” असा अप्रत्यक्षपणे इशाराही त्यांनी भाजप नेत्यांना दिला.
अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार
दरम्यान, ‘इंडिया टुडे’ या माध्यम समुहाच्या माध्यमातून, देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचे आणि कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, “विरोधकांनी कित्येक वेळा मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत, नक्कीच त्यांनी देशाचंही नेतृत्व करावं,” असं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला ‘हा’ धोका! संजय राऊत यांनी दिला इशारा
- संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
- आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
- “बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या घरफोड्या शिवसैनिकाला स्मृतीस्थळाची भेट घेऊ देणार नाही!”