पुणे : घटना समुद्रात बुडवा असे वक्तव्य भाजपचे नेते गणेश बीडकर बोलत असतील तर त्यांनी घटना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू, हे लोकशाही राष्ट्र आहे, त्यामुळे घटना संपुष्टात येत नाही. लोकशाही संपुष्टात आणने कोणाची ताकत नाही. भाजप मात्र लोकशाही सोडून ठोकशाही आणू पाहत आहे. त्यामुळे घटनेची पायमल्ली करणाऱ्या भाजपच्या गणेश बीडकरांनी तात्काळ पदावरून पायउतार व्हावं, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी रोकखोक भूमिका मांडत काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी बीडकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हे पण वाचा : भाजप नेत्याला सत्तेचा माज चढलायं, राज्यघटना पाण्यात बुडवण्याची भाषा चुकीची – दिपाली धुमाळ संतापल्या
देशाची ७५ वी साजरी करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, इंदिरा गांधी यांसारख्या अनेक शुरविरांनी आपल्या प्राणाची आहूती दिली हे आजही दिसून येते. कितीतरी लोकांच्या बलिदानानंतर राज्यघटना लिहिल्या गेली. मात्र, भाजपचे नेते घटना पाण्यात बुडवायची भाषा करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांना जनता येत्या काळात योग्य ती जागा दाखवून देईल. त्यामुळे घटनेची पायमल्ली होत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, असेही आबा बागुल यांनी सांगितले.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” म्हणणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड आक्रमक
नेहमी अशोभनीय भाषा करायची आणि नंतर सॉरी मागयची ही भाजपची नेहमीचीच सवय आहे. “अँग्रेस चले गये अन् सॉरी छोड गये”, अशी गत भाजपची आहे. परंतू, केवळ माफी मागून चालणार नाही. भाजपच्या नेत्याने तात्काळ पदावरून पायउतार व्हाव, शिवाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
२३ गावांच्या विकास आराखड्याला दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली. त्यानंतर एका डिजीटल माध्यमांनी २३ गावांचा विकास आराखडा की आखाडा?, या विषयावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप आणि भाजपचे नगरसेवक तथा सभागृह नेते गणेश बीडकर यांना आमंत्रित केले होते. २३ गावांच्या विकास आराखड्यावर स्पष्टिकरण देतावेळी गणेश बीडकर यांनी चक्क राज्यघटना मान्य नसेल तर ती समुद्रात बुडवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निषेध नोंदवून गणेश बीडकर यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली.
Read Also :
- संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही!
- बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक