मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील इंडिया आघाडीची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जहरी टिका केली. याआधी ईडीचं सरकार होतं आता येड्याचं सरकार आलं आहे. अशा शब्दात नाना पटोले यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर
आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे. याआधी ईडीचं सरकार होतं आता येड्याचं सरकार झालं आहे. यांच्यात कोणताही समन्वय, काही ताळमेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. येड्या सरकारमुळे जनता, शेतकरी, बेरोजगार, तरूण, गरीब त्रस्त आहेत. पवारांनी पंतप्रधानांबद्दल केलेलं विधान खरं आहे. फडणवीस पुन्हा येईन म्हणाले होते, मात्र ते खाली आले. तसेच मोदीही खालच्या पदावर येतीलच. जे भाजपसोबत जातील ते संपतील. असं शरद पवारांना सांगायचं आहे. असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.
हेही वाचा…भाजपसह मोदींची एका सर्व्हेतून झोप उडवली, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ला लोकांची ६५ टक्के पसंती
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून भाजपवर केला जात आहे. तसेच इडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेक नेत्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका