मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील काही वर्षापासून तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर झाला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर
नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने बेल मंजूर केल्यामुळे सगळ्यांना आनंद आहे. दीड वर्षे मलिक जेलमध्ये होते. सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरूय, ते दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांचा दुरूपयोग करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्हांमध्ये फसवून कारवाई केली जात आहे. तपास यंत्रणांचा दुरूपयोग हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल, दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही होत आहे. राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण
नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊशी संबंधित जमीन व्यवहाराच्या प्रकरणात त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल करून अटक केली होती. जमीन व्यवहाराशी संंबंधित प्रकरण, टेरर फंडिंग आणि मनी लॉंड्रिंगचा मलिकांवर आरोप करण्यात आला होता. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील कुर्ला परिसरात गुन्हेगार शाह वली खानसोबत जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. ती जमीन गोवावाला कंपाऊंड नावानं ही जमीन आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलताना हसत होते, दोन तास चेष्टा करत होते”, राहुल गांधींचा हल्लाबोल
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका