मुंबई : आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. नवाब मलिक दावा करत असलेली ‘पॉवर ऑफ एटर्नी’ ही बनावट असलेल्या इडीने काल मलिकांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टोता सांगितले आणि त्यांचा जामीन अर्जाला जोरदार विरोध देखील केला.
“उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई
तसेच हसिना पारकरच्या पुढाकारने झालेला व्यवहार म्हणजे दहशतवादाला रसद असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी पीएमएले कोर्टाला सांगितले. इडीच्या वतीने युक्तीवाद संपला असून आता पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होईल तेव्हा मलिक यांचे वकिल अमित देसाई जामिनासाठी युक्तिवाद करतील.
दाऊद इब्राहिम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपारवून इडीने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी इडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे इडीला तपासात आढळले होते. त्यानंतर इडीने नवाब मलिक यांना ताब्यात घेतले होते.
“वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे दोन बडे नेते आणि माजी मंत्री सध्या तुरूंगात आहेत. यामध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे. यातच आता दोन्हीही नेते जामीनासाठी अर्ज करीत आहेत. परंतु अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही.
Read also
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
- दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान
- “त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
- “तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे