पुणे : महाराष्ट्रातील 6 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये रिक्त होत असलेल्या या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर यासाठी 10 जून रोजी राज्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीसह विरोधी पक्षाला देखील ही निवडणुक महत्वाची मानली जात आहे.
संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
महाराष्ट्रातून भाजपचे पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे यांची मुदत संपत आली आहे. तर शिवसेने संजय राऊत, काॅंग्रेसचे पी.चिदंबरम आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रफुल पटेल यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळ या सहा जागांमध्ये भाजपच्या 3 शिवसेनेची 1 काॅंग्रेसची 1 आणि राष्ट्रवादीच्या 1 जागेचा समावेश आहे. तर देशातील आणखी 14 राज्यातील एकूण 51 जागांसाठी देखील निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.
“टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
विधानसभेत सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचे संख्याबळ असून त्यात शिवसेना 56, राष्ट्रवादी काॅंग्रेस 53, काॅंग्रेस 44, बहुजन विकास आघाडी, 3 समाजवादी पक्ष 2, प्रहार 1 स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, शेकाप 1, अपक्ष 8 इतक्या आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडी 3 खासदार सहज निवडूण आणू शकते. तसेच भाजपप्रणित भाजपकडे 106, रासप 1, जनसुराज्य पक्ष 1 आणि अपक्ष 5 अशा आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपला यामधून 2 जागा सहज निवडून आणू शकतो.
“हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपकडून पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जे आमदार तटस्थ आमदारांची संख्या 4 असून त्यात एमआयएम 2, कम्युनिस्ट पार्टी 1 आणि मनसे 1 अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा आता रिक्त झाली आहे.
Read also:
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल
- “कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
- भाजपने आखली रणनीती; शिवसेनेला घेरण्यासाठी आता अमित शहा येणार !