मुंबई : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत राज्य सरकारने काल महत्वाचा निर्णय घेतला आहे. काल राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महानगरपालिका वगळता सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभार पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी येणार ? याबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“तर सामुहिक कट रचून आमची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करू”, जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. मात्र आताच्या सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला असून महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आलीय. मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता एक सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती. मात्र असं असलं तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तीन सदस्यीय प्रभाग, नगराध्यक्षांची थेट निवडणूक कायम राहणार आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदाराच्या मुलीची युवासेनेत एंन्ट्री, ठाकरे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी ही आता १६ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबत सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुकानंतरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी यापुर्वी ९ जानेवारीला होणार होती. त्यानंतर ही सुनावणी ४ मार्चला होणार होती. मात्र त्यापुर्वीच नवी संभाव्य तारीख समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“४ कोटीची थकबाकीतून फक्त २५ लाख भरले, राणेंना वेगळा न्याय अन् पुणेकरांना वेगळा,” विरोधकांचा सवाल
हेही वाचा…“तर तटकरेंचा 1 लाख 20 हजार मतांनी पराभव होईल”, रायगडमध्ये अजित पवारांना बसणार मोठा धक्का ?
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा”
हेही वाचा…लोणावळ्यात अजित पवारांना मोठा धक्का, तब्बल १३७ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामा, पुढची दिशा ठरली ?
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला जाहीर, २०, १८, १० जागावाटप होणार