मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत जवळपास एकमत झाल्याचे समजत आहे. नव्या फॉर्म्युल्यानंतर ठाकरे यांची शिवसेना २०, कॉंग्रेस १८ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर लढू शकते. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला हे तीन आपआपल्या कोट्यातून जागा देतील अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीकडून विविध प्रस्ताव मांडत जागावाटप अंतिम करण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीची जेव्हा कुठल्याही पक्षासोबत युती नव्हती, कोणासोबतच आमची चर्चा नव्हती, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या २७ जागांवर लक्ष केंद्रीत केले होते.
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?
महाविकास आघाडीने जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव मागितला तेव्हा आम्ही ज्या २७ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते, जिथे आम्ही ज्या २७ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते, जिथे आम्ही संघटनात्मक ताकद उभी केली होती. त्या जागा त्यांना दिल्या. या जागांमधील काही जागा वाटाघाटी होऊ शकणाऱ्या आहेत. त्यासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत. अशी भूमिका वंचितने घेतली आहे. त्यामुळे वंचित आघाडीला नेमक्या किती जागा द्यायच्या, याबाबत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी सर्वात जास्त ठाकरे गटाला २३ जागा देण्यात आली आहे. यातच ठाकरे गटाच्या कोट्यातून वंचितला जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वंचितला अकोला आणि अमरावती या जागा सोडण्यात आल्या आहेत. तर ठाकरे गटाला महाविकास आघाडीकडून २२ ते २३ जागा सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी , छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, द. मुंबई. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई या जागांचा समावेश आहे.
तर कॉंग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या वाट्याला १५ ते १७ जागा सोडण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नागपुर, भंडारा-गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली, ( अमरावती , अकोला, वंचितला सोडण्यास तयार ) लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापुर, सांगली जागा सोडण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामतीसह शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंडी येणार आहेत. यातच छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी कॉंग्रेसाल कोल्हापुरची जागा हवी आहे. परंतु ती जागा सध्या ठाकरे गटाकडे आहे. कोल्हापुरच्या बदल्यात ठाकरे गटाने सांगली ही जागा मागितली आहे. तर हातगणंकले ही जागा स्वाभिमानी संघटनेकडे जाणार आहे.यातच भिवंडीच्या जागेसाठी कॉंग्रेस आणि शरद पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही गटाने आपल्या उमेदवारावर दावा सांगितला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर सामुहिक कट रचून आमची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करू”, जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदाराच्या मुलीची युवासेनेत एंन्ट्री, ठाकरे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर
हेही वाचा……दादा स्विकारणार का शरद पवारांचं निमंत्रण ? नमो महारोजगार मेळाव्यावरून रंगणार मानापमान नाट्य
हेही वाचा“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?