मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा वाटप करण्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीत वंचितसह राजु शेट्टी स्वाभिमान संघटनेला देखील महाविकास आघाडीकडून लोकसभेची जागा देण्यात आली आहे. काही जागांवर पेच अद्यापही आहे. परंतु इतर सर्व जागां आता फिक्स झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…अक्षय कुमार अन् विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी सर्वात जास्त ठाकरे गटाला २३ जागा देण्यात आली आहे. यातच ठाकरे गटाच्या कोट्यातून वंचितला जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वंचितला अकोला आणि अमरावती या जागा सोडण्यात आल्या आहेत. तर ठाकरे गटाला महाविकास आघाडीकडून २२ ते २३ जागा सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी , छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, द. मुंबई. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई या जागांचा समावेश आहे.
तर कॉंग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या वाट्याला १५ ते १७ जागा सोडण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नागपुर, भंडारा-गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली, ( अमरावती , अकोला, वंचितला सोडण्यास तयार ) लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापुर, सांगली जागा सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा ग्रुप भाजपात दाखल, कॉंंग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका
राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामतीसह शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंडी येणार आहेत. यातच छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी कॉंग्रेसाल कोल्हापुरची जागा हवी आहे. परंतु ती जागा सध्या ठाकरे गटाकडे आहे. कोल्हापुरच्या बदल्यात ठाकरे गटाने सांगली ही जागा मागितली आहे. तर हातगणंकले ही जागा स्वाभिमानी संघटनेकडे जाणार आहे.यातच भिवंडीच्या जागेसाठी कॉंग्रेस आणि शरद पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही गटाने आपल्या उमेदवारावर दावा सांगितला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
हेही वाचा…निलेश लंके डबल रोलमध्ये, ऐनवेळी घड्याळ सोडून तुतारी फुंकून भाजपचा गेम करणार?
हेही वाचा..शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली