पुणे : अनेक वादांसाठी चर्चेत राहणारी एल्गार परिषद यावर्षी देखील पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानीच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे, असे वक्तव्य उस्मानीने एल्गार परिषदेत केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.
हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या शर्जील उस्मानीसारख्या सडक्या व विकृत मानसिकतेच्या लोकांचा तातडीने बंदोबस्त करण्याची गरज आहे, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आपण हा बंदोबस्त करणार का?@CMOMaharashtra@BJP4India @BJP4Maharashtra @bjp4mumbai pic.twitter.com/NQ5MZWGtoK
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 31, 2021
दरेकर म्हणाले की, शरजील उस्मानी यांनी केलेलं हे वक्तव्य हे विकृत मानसिकतेतून आलं आहे. त्यांचाच मेंदू सडला आहे, असं दिसतंय. आता या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.
मुस्लिम समाजावर एखादं वक्तव्य झाल्यावर तात्काळ कारवाई केली जाते किंवा भूमिका घेतली जाते, आता हे वक्तव्य आल्यावर या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असा टोला देखील दरेकरांनी शरद पवारांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे हिंदू समाजावर टीका करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे दाखवून द्यावं ही अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
Read Also :
- राम मंदिरासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्यावतीने 1 कोटींचा निधी, आमदार लांडगेंचा पुढाकार
- भाच्याला मुख्यमंत्री करणे हाच ममता बॅनर्जींचा अजेंडा, अमित शहांचा हल्लाबोल
- तात्याराव लहानेंच्या फडणवीस सरकारवरील ‘त्या’ आरोपांवर दरेकर म्हणाले…
- … त्यासाठी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो – रोहित पवार
- राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसकडून प्रस्ताव मंजूर