मुंबई : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील संघटनांनी संप पुकारलेला आहे. या संपात वीज कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला आहे. त्यामुळे देश अंधरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच यावर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
वीज कर्मचाऱ्यांना माझं सांगणं आहे की, संप करून वेठीस धरून खासगी कंपन्यांना यामुळे वाट मोकळी करून देऊ नये. यावर महावितरण सेवा करणारी कंपनी योग्य तो तोडगा काढेल. या संपाचा वीज निर्मितीवर परिणा होत असून नाशिकच्या एकलहरे भागातील दोन प्लांट बंद झाले आहे. त्यामुळे आपल्यावर लोडशेडिंग करण्याची वेळ येऊ देऊ नका, अंस नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
तुम्ही एक पाऊल पुढं या आम्ही एक पाऊल पुढं येतो. असं आवाहन देखील नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना केलं आहे. कोयना बंद पडलं नाही. आम्ही जलसिंचन प्रकल्प सुरू करतोय. त्यामुळे कोळशाच्या खाणीतुन कोळसा येत आहे. रेल्वेनं तो कोळसा आणला जात असून दीड दिवस आणि दोन दिवसाचा साठा येण्याची शक्यता आहे. असं देखील त्यांनी सांगितलंय.
” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
दरम्यान, यावेळी जवऴपास ३६ वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी वीज कर्मचारी यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये. सध्या उष्णता वाढली आहे. वीजेची मागणी ही वाढलेली आहे. दहावीच्या-बारावीची परीक्षाही सुरू आहे, शेतामध्ये व पीक असल्याने सिंचनाची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये आणि संप मागे घ्या असं आव्हान नितीन राऊत यांनी केलं.
Read also:
- आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले
- आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
- आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप
- अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला