मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ईडीने अटक केलेल्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या खाती काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. यावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडील असलेली खाती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.
‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
याबाबत राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने अधिसुचना देखील जारी करण्यात आली आहे. राज्यपालांनी मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अल्पसंख्यांक मंत्रिपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिला आहे.
आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
त्याचबरोबर राज्य सरकारने नवाब मलिक यांच्याकडे असणार गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदीया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती केली आहे. तर परभरणीचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे दिली आहे.
प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
दरम्यान, राज्यात नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून फार गदारोळ माजला होता. विरोधी पक्षांनी नवाब मलिक यांची राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण काही काळ चांगलाचं तापलेलं दिसून आलं होतं. नवाब मलिक यांच्याकडील जबाबदारी काढून घेतल्याने ते आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहे.
Read also:
- “शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
- राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
- ” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
- पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार
- निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’