सातारा : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि श्रीमंत रामराजे यांच्या पुढे हरलो नाही मग या ठिकाणाच्या आंडू पांडूनी माझा नाद करू नये, असं वक्तव्य माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. ते फलटण येथे झालेल्या शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शनाच्या समारोप समारंभामध्ये बोलत होते.
आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
यावेळी त्यांनी फलटणचे उद्योजक दिंगबर आगवणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार मला आणि आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून दोन पिढ्या संघर्ष करून आलेलो आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
दुष्काळी भागाला मिळालेल्या निधीवरून 800 कोटीत किती शुन्य असतात हे सांगावं, आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलं आहे. खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि ते स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी 800 कोटींचा निधीबाबत चर्चा केली होती. अंसही ते म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
दरम्यान, गेल्या वर्षी राज्यात विविध भागात दुष्काळग्रस्त निर्माण झाली होती. त्यावेळी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं.
Read also:
- राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
- ” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
- पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार
- निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
- ‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका