मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिक, प्रवीण दरेकर आणि केंद्रीय तपास यंत्रणां याच मुद्यावर पार पडलं. यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी एकमेंकावर जोरदार आरोप-प्रत्यारोप केलेत. आता याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सत्ताधारी पक्षांवर टिका करत विरोधी पक्षाला देखील घरचा आहेर दिला आहे.
प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांच्या राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी राज्याच्या अधिवेशनात हेच चित्र पहायला मिळालं. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा व्हायला पाहिजी होती. परंतु राजकीय मुद्यावर वेळ घालवला. असं त्यांनी म्हटलं आहे. वरळीतील मार्स-1 या प्री प्राथमिक शाळेचं उद्घाटन करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधताना त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
केंद्र सरकारच्या कामगिरीवर जनता खुष आहे. सरकारकडे मागण्या मागायला काही संघटना सरकारकडे आल्यास त्यांचा तो हक्क आहे. सरकार त्या नक्कीच पुर्ण करेल. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या लोकांची मी प्रतिनिधी आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पक्षातील लोकांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
दरम्यान, एसटी संपाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, एसटीबाबत व्यवस्थित चर्चा झाली नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळेच हा वाद चिघळला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्याबाबत तपास यंत्रणा तपास करतील. त्यावर मी फार काही बोलणार नाही. मुख्यमंत्री सभागृहात काय बोलले हे मी ऐकलं नसल्याचंही त्या म्हणाल्या.
Read also:
- ” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
- पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार
- निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
- ‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
- आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत