मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची इडीकडून चौकशी सुरू आहे. आज पहाटेच सीआरएपच्या जवानांसह इडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहचले. त्यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. याच प्रकरणावरून राज्यातील राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
…म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
शरद पवार म्हणाले की, राज्यात कोणतीही घटना घडली की विशेष करून मुस्लिम कार्यकर्ता असला त्याचा दाऊदशी संबंध जुळवला जातो. मी ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा ही असाच प्रकार घडत होता. त्याला आता २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु ती नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरुच आहे.
…त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले
जी माणसं केंद्र सरकार आणि भाजप यांच्या विरोधात उभी राहतात त्यांना हा इडीकडून त्रास दिला जातो. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर नवाब मलिक यांच्यावर इडीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या वर जोरदार टीका करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.
Read also:
- भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला
- कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा
- मोठी बातमी: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक, महाविकास आघाडीला मोठा धक्का
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसोबत लबाडी करत आहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- …तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांची सरकारकडे मागणी