मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका कार्यक्रमात देशात सर्व प्रादेशिक पक्ष संपून जातील आणि फक्त भाजपचं शिल्लक राहिल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली. जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरूनच की काय बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टिका केली आहे.
“ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा बोलले, देशातील सर्व घटक पक्ष संपून जातील आणि केवळ भाजप उरेल. याचं उदाहरण राज्यांत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. यासाठी ईडी ,CBI चा वापर केला, आज सुशील मोदी तेच बोलले. शिवसेनेप्रमाणे बिहारमधील नितिश कुमार यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडणार. अशी शक्यता देखील अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यावर आता भाजपची काय प्रतिक्रिया येणार ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहारमधील परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे. जे, पी. नड्डा यांच्या वक्तव्यामुळेच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पाऊलं उचललं आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना म्हणाले होते की, शिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे. देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष संपून जातील आणि फक्त भारतात भाजपच शिल्लक राहिलं अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं.
“एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”
दरम्यान, 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काॅंग्रेससोबत महाआघाडी केली. जदयु आणि राजदने 101 जागांवर निवडणुक लढवली. तर 80 जागांवर विजय मिळवला. जदयूने 71 जागांवर ताबा घेतला. नितीश कुमार महाआघाडीचे नेते बनले आणि पाचव्या वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर 29 जुलै 2017 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. तेव्हा देखील त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं.
Read also
- “ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
- “शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
- पाटलांची मंत्रीपदासाठी वर्णी लागल्याने, बावनकुळेंकडे मोठी जबाबदारी, शेलारांकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद?
- “भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”