मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज पहिल्या टप्यातील मंत्र्याचा शपथविधी झाला. यामध्ये भाजपच्या 9 आणि शिंदे गटातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाही महिला आमदार आणि अपक्ष आमदारांना संधी दिलेली नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या संजय राठोड यांनी ही मंत्रिमंडळात संधी दिल्यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
बेकायदेशीर सरकारने आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला मात्र आज त्यांचा पाळणा हालला आहे. परंतु क्रांती दिवसाच्या दिवशी त्यांनी बेकायदेशीर सरकारने शपथ घेतली ही गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला रूचलेली नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ही काळी नोंद झाली आहे. या सरकरने अनेक वेळा महिलांना मान सन्मान देण्यात यावा. याचा दिखावा केला, पण आज एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान नाही. जी महिला खांद्याला खांदा लावुन काम करते, आशा महिलेला सरकारमध्ये स्थान नाही. अशा लोकांसोबत तुम्ही काम का करत आहात ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी, मातीशी गद्दारी केली आहे. ते लोकांना कधीच न्याय देऊ शकत नाहीत, असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
मंत्रिमंडळात आज ज्या नेत्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये निम्म्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असणारे आमदार आहेत. भाजपमध्ये जाताच त्यांना गंगेमध्ये धुतल्यासारखे पवित्र केलं आणि त्यांना आज मंत्रिपद दिलं, थोडी तरी लाज आहे का? असा टोला लगावला आहे. भाजप फक्त सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाऊन संविधानाची, लोकशाहीची पायमल्ली करत आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे करून स्वत:च्या सत्तेची पोळी भाजुन घेणारा भाजप हिटलरशाही पक्ष म्हणुन लोकांसमोर चाललेला आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे.
“ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
संजय राठोड हे महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मंत्री असताना पुजा चव्हाण प्रकरण झालं. या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई करा असं भाजप नेते चित्रा वाघ, किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस ओरडून ओरडून सांगत होते आणि आता त्याच संजय राठोडला पवित्र करून घेतलेले आहे. चित्रा ताई त्यांच्या बंगल्यावर राखी बांधायला जाणार आहेत. कुठे गेले तुम्हा केलेले आरोप. तुमचा लढाई खोटा आणि तुमचा चेहराही खोटा महाराष्ट्रातील माता भगिनिंच्या समोर आलेला आहे आसंही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.
Read also
- “ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
- शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’
- “एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”
- “भाजपला ‘गॅंग ऑफ वासेपुर’ ही उपमा देणारे महोदय आता भाजपमध्ये विसावलेय”
- “उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा