मुंबई : भाजपाच्याच सरकारविरोधात भाजपाचेच पदाधिकारी न्यायालयाची लढाई लढण्याची भाषा करतात. नैतिकतेची व स्त्री दाक्षिण्याची नवनवीन परिमाणं भाजपा समोर ठेवत आहे. सत्तेसाठी काहीही करणारा भाजपा जगातील सगळ्यात दांभिक व खोटारडा पक्ष आहे. ‘बहुत हुआ महिलाओंपर अत्याचार, अबकी बार मोदी सरकार’ विसरले? अशी टिका काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्याबाबत ते बोलत होते.
“इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा, असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपा कडेच आहे हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात ही स्पष्ट झाले विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते. असंही देखील त्यांनी म्हटलं आहे.
“मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
आज राज्यपालांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. अडीच वर्षांनंतर त्यांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत. असंही म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. पुजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये त्यांना मंत्रिपदाचा यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ य़ांनी संजय राठोड यांच्यावर सातत्याने आरोप टिका करीत होत्या. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यानंतर त्यांनी टिका केली आहे. तर विजय कुमार गावित यांच्यावर देखील भाजपने धक्कादायक आरोप केले होते.
आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, तानाजी सावंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील दादा भुसे, विजय कुमार गावित यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. राजभवनात आज राज्यातील सर्वच पक्षातील नेते हजर आहेत.
७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 9, 2022
Read also
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
- मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
- TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
- एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
- औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी