दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदाचा कारभार बुधवारी संपणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निरोपाचे भाषण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नायडू बुधवारी पद सोडणार आहेत तर जगदीप धनखड 11 ऑगस्टला पद आणि गोपिनीयतेची शपथ घेणार आहेत. निरोप देताना मोदींनी नायडूंच्या वनलाइनरचं कौतुक केलं. तुमची वन लाइनर चातुर्यपुर्ण असतात. तुम्ही एका वाक्यात सर्व काही जिंकता त्यापुढे काही बोलायची गरज नाही. तुमच्या कोणत्याही बोलण्याचा विरोध करू शकलो नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
संसदेचं पावसाळी अधिवेशन हे नियोजित वेळेआधीच गुंडाळले गेलं आहे. तर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. 12 ऑगस्टला संपणाऱ्या अधिवेशनाची 4 दिवस आधीच समाप्ती करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज ३८ तास चालले तर ४७ तास वाया गेलं असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले. तर उपराष्ट्रपती नायडू यांच्या निरोपाच्या भाषणावेळी सभागृहात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक कविता सादर करत आठवलेंनी काँग्रेसवरही टीका केली.
“भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
रामदास आठवले यांनी संसदेत सादर केलेली कविता
में जब बोलता था तब आप बेल बजाते थे, आप बेल बजाते थे मेॆं बोलते रहता था
सभापती महोद्य आप हमे छोडकर जा रहे है, हम याहा क्या करेंगे
आपने हमें इतना विश्वास दिया है, हम किसिको नही डरेंगे, 2024 का चुनाव नरेंद्र मोदीजी नही हारेंगे
आपने मुजे दिया मोका हर बार, इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार
आप कभी नही मानने वाले है हार, इसलिये आप आईये फिर एक बार
जो आते थे बार बार वेल, उनको सस्पेंड करके आपने उनका बंद करदिया खेल
काँग्रेस वाले तो आपके सामने हो गये है फेल, इसलिये अबी नही आयेंगे बेल
आठवले यांनी निरोपाच्या भाषणात ही कविता म्हणात काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
“हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सवात 25 वर्षाचा नवा प्रवास सुरू करू पाहत असताना देशाचे नेतृत्वही एका नव्या युगाच्या हाती आहे. यावेळी आपण असा 15 ऑगस्ट साजरा करत आहेत, जेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, पंतप्रधान हे सर्व ते लोक आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. प्रत्येकजण अगदी साध्या पार्श्वभूमीतून येतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Read also
- “मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
- आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
- मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात