जळगाव : आडव्या उभ्या स्टोरी करून विविध माध्यामांतून अडकावण्याचा जो प्रकार सुरू आहे. तुम्ही लवकरच तुरूंगात जाणार आहेत, असं ते म्हणत आहे. जायचं असेल तर जाणार तुरूंगात परंतु हम तो डुंबेंगे सनम पर तुमको भी लेके डूबेंगे, असं म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता ते भाजपवर सातत्याने टिका करताना दिसत आहेत.
“हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
इडी नावाचा प्रकार आता घरोघरो पोहचला आहे. माझ्यामागे इडी लागली, सीबीआय लागली, अॅंटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं, त्यानंतर काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. परंतु त्यांना माहिती आहे की एकनाथ खडसेच त्यांच्या उरावर बसू शकतो. जे होईल ते कायद्याने होईल, कायद्यावर आमचा विश्वास आहे. परंतु नाथा भाऊंनी 40 वर्ष राजकारणात काम केलं आहे. हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला आहे.
“अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या भानगडी होणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं माझे 50 आमदार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, शिंदेंनी मुक्ताईनगर पाचोरा, जळगाव जिल्ह्यातील आमदार निवडून आणलेच पाहिजे. मग काय भाजपचे बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांचा गरज काय ? भाजपचा पत्ता कट यांच्यात पुढे चांगल्याच भानगडी होतील, शिंदे गटाच्या 50 आमदारांचे तिकीट वाटप करून मोकळे झाले. त्यामुळे भाजपच्या 50 आमदारांचा तिकीट आता कापले जाणार हे खरं आहे. असं देखील ते म्हणाले.
“मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं बळ मिळालं आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळतात. तसेच हम तो डुबेंगे सनम पर तुमको भी ले के डुबेंगे हा इशारा त्यांनी गिरीश महाजन यांनाच दिला आहे.
Read also
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
- “आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
- “एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
- “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
- “राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”