मुंबई : कर्जतमध्ये नुपुर शर्मा यांना समर्थन दिल्याने प्रतिक उर्फ राजेंद्र पवार या युवकावर 15 ते 20 लोकांच्या गटाने हल्ला केला. भाजपच्या निंलबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून कऱण्यात येत आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्ह्या रूग्णालयात नेण्यात आलं आहे. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हिंदुंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
“मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देत आहे, परंतु याबाबत आवाज उठवायला ‘आमचं हिंदुत्व’ कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आमचा’ तिसरा डोळा कधी उघडत नाही. पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका आहे, असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.
“काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही कधी घडणार नाहीत. संत शिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत. त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं. आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असंही आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी सरकार नाही. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत. महाराष्ट्रात आता शिंदे-फडणवीस हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंवर अत्याचाराच्या किंवा हिंसेच्या घटना घडल्या तर आम्ही हिंदु म्हणुन जशास तसं उत्तर देऊ. आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तर आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं एकलं का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हीही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी जशास तसे उत्तर देऊ, हिंदुंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावायचा प्रयत्न करू नका असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
Read also
- “एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
- “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
- “राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
- “हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”