औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये शिंदे गटाला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात वादाला सुरूवात झाली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उमेदवार पळवले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांना केला आहे. त्याचबरोबर या निवडणुकीसाठी त्यांना मोठी रसद मिळाली होती, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे यांना सध्याच्या घडीला मातोश्रीला खूश करायचं आहे. मीच कसा निष्ठावंत आहे, हे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधान संजय शिरसाठ यांनी केलं आहे. यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटातील वादाला पुन्हा सुरूवात झाली आहे.
आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर शिंदे गटाला हादरा, शिंदे गटाचा पराभवाला सुरूवात, असं म्हटले गेलं असतं. 40 हजार मतदारांनी आम्हाला बहुमत दिलं आहे, याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर आम्हीही याचा स्विकार केला असता, असं संजय शिरसाठ म्हणाले.
“राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”
राज्यातील ग्रामंपंचायतीच्या निवडणुकीचा नुकताच निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने 82, शिंदे गट 40, शिवसेना 27, राष्ट्रवादी काॅंग्रेस 53, काॅंग्रेस 22 तर इतर 47 जणांनी बाजी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत.
Read also
- “राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
- “हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
- “मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
- “काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”