मुंबई : कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. राज्यात आताही सत्तेत बसलेले सत्तेवर किती काळ राहतील हे सांगता येत नाही. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केलं. त्यावरून आता भाजपच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अजित पवारांनी राज्य सरकारबाबत काळजी करू नये, असा सल्ला माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
“काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
मला अजित पवार यांचं आश्चर्य वाटतं. त्यांनी विचारलेले प्रश्न एका महिन्यातच निर्माण झाले का? अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केले? किती प्रश्नांची सोडवणूक केली त्याचा लेखाजोखा जनतेसमोर त्यांनी मांडावा आणि आम्ही एक महिन्यात काय विकासकामे केली ते जनतेसमोर मांडतो. आमच्याकडे अजून जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यामुळे अजित पवारांना चिंता नसावी.
नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
ज्या मानसिकतेत आपण असतो तेच आपल्याला दिसत असतं. तुमचे मुख्यमंत्री, मंत्री घरचेच होते. इतर मंत्री असूनही दोघांच्याच हातात कारभार होता. तुमच्या बाबतीत ‘हम दो, हमारे दो’ असं कुणी बोललेलं तुम्हाला चाललं असतं का? दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोट आहेत हे लक्षात ठेवावे. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना सगळ्या फाईल्स मात्र तुमच्याकडे असायच्या. सगळा कारभार तुमच्याकडे होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यावर बोट दाखवू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
आमचे दोनही नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत. त्यांना प्रशासकीय कामांचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे सचिवांना अधिकार दिले असले तरी ते नीट समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आता विरोधकांकडे विशेष काही नसल्यामुळे ते काही ना काही कारणांवरुन रोज टीका करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
- “राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
- “हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
- “मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”