मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आज 18 नव्या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारमध्ये अपक्ष आमदारांना डावलण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून अपक्ष आमदार बच्चू कडू हे कॅबिनेट पदासाठी उत्सुक होते. तसे त्यांनी बोलून देखील दाखवलं होतं. मात्र त्यांना पहिल्या टप्प्यात संधी न दिल्यामुळे आगामी काही काळात बच्चू कडू काय भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
कालच त्यांनी यासंदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की, आमचा पक्ष प्रहार आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही. त्यामुळे निश्चितच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता. तसेच येणाऱ्या विस्तारात मंत्रिपद देऊ असं म्हणाले होते. मात्र काही तांत्रिक कारण असेल. त्यामुळे अपक्षांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. कधी-कधी दोन पावले मागे यावे लागते, त्यामुळे अजूनही त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
मी तरी मनावर घेत नाही. विविध योजनांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. मंत्रिपद तर आमचा अधिकार आहे, तो आम्ही मिळवणारच. मात्र सोबतच जनतेची कामेही महत्वाची आहेत. विविध कामे आहेत. त्यामुळे हे सरकार अपक्षांशिवाय राहू शकत नाही. मोठी संख्या आहे. त्यांना आमचा विचार करावाच लागेल. तसेच त्यांनी दिलेल्या शब्दावर आपण ठाम आहे असं बच्चू कडू म्हणाले.
“अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, तानाजी सावंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील दादा भुसे, विजय कुमार गावित यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातून 9 तर भाजपकडून 9 असे एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत.
Read also
- TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
- एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
- औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
- “इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
- “मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण