मुंबई : शिंदे सरकार मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना मंत्रिपदापासून डावललं गेलं आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा आणि अपक्ष आमदारांना स्थान दिलेले नाही. तर घोटाळेबाज आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिल्या यावरून विरोधी पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे.
एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
व्वा ! हिंदुत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारने मोहरमचा मुहूर्त साधत मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. घोटाळेबाजांना मंत्रिमंडळात स्थान देऊन या सरकारने आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली आहे. नवनिर्वाचित मंत्र्यांना शुभेच्छा! नाराजांच्या दुःखाला लवकरच वाचा फुटो, असं ट्विट करत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत टिका केली आहे.
“इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
Read also
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
- मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
- TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी