पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. यंदा कडक बंदोबस्त आणि नियमावली केली असून पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलं. या घटनेवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“दिल्लीच्या पातशाहांना पत्र लिहून औरंग्याच्या स्मारकाचा दर्जा काढायला सांगा”, दानवें अन् भाजपात ट्विटवार
११ जून आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचा प्रथम प्राध्यान्य होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर ‘देशद्रोहाचा गुन्हा’ दाखल करा, अन्यथा…”, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
दरम्यान, हिंदुत्वाचे सरकार असल्याचा आव आणणारा टिल्लू आमदार व अध्यात्मिक आघाडीचा तो “झाकणझुल्या” कुठाय?आळंदीच्या पालखीत वारकऱ्यांवर झालेला हल्ला निषेधार्य असुन गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाहीत. असा इशारा अमोल मिटकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
हेही वाचा…मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाही
हेही वाचा…अमित शाह काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात, नांदेडमध्ये जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे