मुंबई : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिल्लीतून अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवली. खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अद्याप कोणतेही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यावरून सामानातून अजित पवार यांच्याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर ‘देशद्रोहाचा गुन्हा’ दाखल करा, अन्यथा…”, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षापुर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व ठपका कायमचा दुर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल. असं सामनातून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही”, जयंत पाटलांची नाराजीवर प्रतिक्रिया
दरम्यान, महराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार व त्यांचा पक्ष हे एक महत्वाचे घटक आहेत हे नक्कीच मान्य करावे लागेल व त्यामुळेच भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली तर दुसरीकडे दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील असं सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
हेही वाचा…मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाही
हेही वाचा…अमित शाह काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात, नांदेडमध्ये जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे
हेही वाचा…“दिल्लीच्या पातशाहांना पत्र लिहून औरंग्याच्या स्मारकाचा दर्जा काढायला सांगा”, दानवें अन् भाजपात ट्विटवार