नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र यावेळी अजित पवारांना राष्ट्रवादीतून डावलण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…वादळी वाऱ्याने भाजपच्या कार्यक्रमातील मंडप कोसळला, नेत्यांची फजिती, लोकांचा गोंधळ, नितेश राणेंसह…
कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविली. हा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार बाहेर आलेत. परंतु प्रसार माध्यमांशी न बोलताच निघून गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्या बैठकीलाही अजित पवार हजर नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वतवले जात आहेत.
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम राष्ट्रीय स्तरावर सुरू असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला आहे. शंकेला कुठेही जागा नाही. अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही. पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सध्या सुरू आहे. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू”, भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“ह्यदयात महाराष्ट्र..अन् नजरेसमोर राष्ट्र.. म्हणत अजित पवाराचं सुचक वक्तव्य, शरद पवारांनी भाकरी फिरवली पण…
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवारांचे धक्कातंत्र! अजित पवारांचा हात मोकळा, मात्र सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“तर मी खासदारकीचा राजीनामा देईन,” कल्याणमधील भाजप-शिंदे वाद विकोपाला, श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायच्या तयारीत