जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोनलकर्त्यांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात आंदोलन कर्त्यांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली. यात जवळपास ४५ पोलीस जखमी झाले आहेत. यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जंपुली आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केलीय.
हेही वाचा…“फडणवीस क्रूरतेच्याबाबतीच मोदी आणि शहांनाही मागे टाकताहेत, अगोदर ‘वारकरी’ अन् आता ‘मराठा बांधव’”
आमची सत्ता आली तर मराठा समाजाला लगेच आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दगाबाजीने सत्ता आली. पण आरक्षणाऐवजी लाठ्या काठ्यानी मराठ्यांवर हल्ला केला, मराठा समाजाशी दगाबाजी केली. याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय. कुठं आहे आरक्षण? आणखी किती खोटं बोलणार? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन चिरडलं”, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
दरम्यान, जालन्यात मराठा समाजावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर अनेक नेत्यांनी आता जालन्यात भेटीगाठी दिल्या आहेत. यातच सकाळी माजी खासदार संभाजी राजे यांनी देखील मराठा आंदोलनकांशी भेट घेतली. तर जखमी झालेल्या मराठा बांधवाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंबड रूग्णालयात भेट घेत तब्येतीची विचारपुर केलीय.
आमची सत्ता आली, तर मराठा समाजाला लगेच आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
दगाबाजीने सत्ता आली. पण, आरक्षणाऐवजी लाठ्या काठ्यानी मराठ्यांवर हल्ला केला, मराठा समाजाशी दगाबाजी केली.
याच दगाबाजीविरुध्द मराठा समाज पेटून उठलाय.
कुठं आहे आरक्षण?
आणखी किती खोटं बोलणार?… pic.twitter.com/Em3qR6PfF2— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप