रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फुटल्याने उद्धव ठाकरेंना याचा मोठा फटका बसला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर तुटून पडलेत. विविध भाषणांमधून बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार म्हणून सातत्याने ठाकरे करीत आहेत. यातच आता बंडखोर आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली आहे. ते दापोलीत एका जाहीर सभेत बोलत होते.
“ताई अजून तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत”; मनसेचा ‘त्या’ ट्विटवरून टोला
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरून बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवाराच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तु पुढे चल तुझ्यासोबत मी आहे, असं बाळासाहेब आजवरून सांगत असतील. असा टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खुन पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्धध्वस्त झालं, संसार उद्धधवस्त झालेत. तुमचं काय योगदान? असा सवाल देखील त्यांनी केला.
“एक गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला, ही लोकशाहीची खासियत”; चंद्रकांत पाटील
पुढे बोलतांना ते म्हणाले की, वारंवार मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तु त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का? असा खोचक टोला देखील त्यांनी हाणला.
जगातला पहिला प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला. जसा कायदा केला तसं आदित्य टूनटून उड्यामारून मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तु काय केलं. तु अजून लग्न केलं नाही तु काय करणार आहेस. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री आणि मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला. याला खरी गद्दारी म्हणतात. असा घणाघात देखील त्यांनी आदित्य़ ठाकरेंवर लगावला.
Read also
- सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप
- “शिंदेंनी मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचं फडणवीसांना पचलं नाही, म्हणून ते…;”रूपाली पाटलांचा खोचक टोला
- अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका
- “शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्तपणे वागतात, अन् ते फक्त अजित दादांना घाबरतात”; धनंजय मुंडे
- “शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, पण मंत्रिपद केव्हा मिळणार माहीत नाही?” बच्चू कडू