मुंबई : : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना मुंबई सत्र न्यायालयकडून दोषमुक्त करार करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ‘सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं,’ अश्या अंदाजात त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही आणि कुणावरही लोभ नाही,’ असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? मलिकांचं मोठं विधान; केली ‘मिशन ११४’ ची तयारी सुरु
‘माझ्याकडून कंत्राटदाराला एक फूटही अधिक FSI मिळालेला नाही. आमच्यावर सगळे खोटे आरोप लावण्यात आले. मला विनाकारण तुरुंगवास झाला. पण गणेशोत्सवाच्याआधी एक संकट दूर झालं. ‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती,’ असा शायराना अंदाजही त्यांचा यावेळी पाहायला मिळाला. ‘तुमचा आशीर्वाद आहे. पवारसाहेबांचे आभार, जयंतराव-अजितदादांचे आभार, उद्धवजींचेही आभार, पाठीमागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.
ब्रेकिंग! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांसह ७ जणांची निर्दोष मुक्तता
‘या निर्णयानंतर ताबडतोब पवारांना सांगणं अपेक्षित होतं, मुख्यमंत्र्यांनाही आनंद व्यक्त केला. पण काही लोक मला अजूनही झोपू देणार नाहीत, याची मला माहिती आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मी आता शांत झोपणार आहे. तुरुंगात गेलो, याचं दु:ख आहे पण ते किती वेळ उगाळायचं. या सगळ्यात माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकरांना त्रास झाला. पण आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे? त्यामुळे, माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही,” अशी भावना त्यांनी मांडली.
‘आमचं सरकार आहे, म्हणून सुटका झाली असं नाही. माझ्या वकिलांनी माझी बाजू तगडी मांडली आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. त्यामुळे, आता आज पुन्हा दु:खाचा पाढा वाचणार नाही,’ असं म्हणत, ज्यांना सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं,’ असं उत्तर त्यांनी अंजली दमानींयांना दिलं आहे. या निर्णयानंतर त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी या सर्व प्रकरणात आपण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे.
Read Also :
- शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
- शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांवर राष्ट्रवादी नाराज? मलिकांनी स्पष्ट केले कारण
- ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
- पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
- एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED