मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम संपुर्ण देशभरात सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचला असून पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा १७ मार्च रोजी थंडावल्या आहेत. तर काही मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर करण्यास झाली आहे. आज पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. दुसऱ्या बाजूला पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे तसेच इतर उमेदवार अर्ज सादर करणार आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीची सभाही यावेळी पार पडणार आहे. मात्र त्याआधी एबीपी माझा-सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार अजित दादा गटाला मोठा धक्का बसला आहे.
एबीपी सी व्होटर सर्व्हेने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ? याचा सर्वे केला आहे. या सर्व्हेतून आलेल्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला ३० तर महाविकास आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. यातच भाजपला २१ जागा शिवसेना शिंदे गटाला ९ जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ९ जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच जागा तर कॅंग्रेसला 3 मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र यामध्ये अजितदादा गटाला एकही जागा मिळणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजित दादा यांना निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा….“अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्षनाव हे देखील अजित पवार गटाला मिळाले. त्याआधी अजित पवारांनी आपल्या ४० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन शरद पवारांची साथ सोडली. यासह संपुर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी राहिलेल्या शिलेदारांना घेत लोकसभेची तयारी सुरू केली. यातच आता राज्यात दोन मोठे पक्ष फुटले असून लोकांची सहानुभूती ही शरद पवारांच्या बाजूने असल्याचे एबीपी व्होटरच्या सर्व्हेतून दिसून आलीय.
बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उभ्या राहिल्या आहेत. तर शिरूरमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना अजित पवारांनी उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्यासमोर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं मोठं आव्हान आहे. ती जागा देखील अजितदादांच्या हातून सुटणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर परभणीची जागा ही अजित पवार गटाला सोडण्यात आली असून ती महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर रायगडमधून सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याठिकाणी ठाकरेचे अनंत गिते विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
READ ALSO :
हेही वाचा…Live Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची पुण्यात सभा, लाईव्ह