जालना : माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद सगळ्यांनाच माहिती आहे. अनेकदा हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र यावर रावसाहेब दानवे यांनी कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही. अशातच आज हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले आहेत.
संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात ते म्हणातेत की, रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मला त्यांना एकच सांगायचं आहे, यावर न्यायालयात जे काय व्हायचं ते होणारच आहे. सगळं काही विषय न्यायालयात येणारच आहे. परंतु आपल्याला जर वाटत असेल तर की हर्षवर्धन झुकेल आणि आपल्या पायाशी लोटांगण घेईल तर असे होणार नाही.
“चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”
त्यामुळे मी मरणं पंसद करेन, जेलमध्ये जायला तयार आहे. परंतु स्वाभिमान कधीच गमवणार नाही. आपण मंत्री आहात, मोठ्या पदावर आहात, वाटेल ते कलं आहे. आणि करणार आहात, मला सगळं माहित आहे. पण स्वाभिमानाचा झेंडा मी कधीच सोडणार नाही. आम्हीपण लखोजी जाधवांचे वंशच आहोत सोपं नाही. असा देखील त्यांनी इशारा दिला आहे.
Read also:
- “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
- ” राज्याचे मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतंय”; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
- “राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
- “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा