पुणे : जम्मू खोऱ्यात मागील काही वर्षापासून टार्गेट किलिंगच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूना दहशतवाद्यांनी ठार मारण्यात आलं. यावर्षी खोऱ्यात आतापर्यंत 26 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90 च्या दशकातील भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
“वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा वेळ आता सुरू झाली”; राऊतांनी भाजपला ललकारलं
या घटनांमुळे काॅंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर याप्रकरणांवरून जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले की काश्मिरी पंडितांवर आधारीत सिनेमा बघून मोदी अश्रू गाळतात. पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, असं नाना पटोले यांनी काश्मिर मधील घटनांवरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये हिंदुंना सातत्याने दहशतवादी लक्ष्य करताना दिसत आहेत. काश्मिरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे अनेक काश्मीर पंडितांनी गुरूवारी काश्मीर सोडलं आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदुंनी काश्मिर खोरं सोडलं आहे.
“2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार
जम्मू काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या घटनांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता हिंदुना बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे, असं म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदुच्या हत्या होत आहेत. ते पाहता हिंदुंना सरकारने स्वरंक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच बंदुका आणि ते चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे. अंस म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहाराचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संतप्त व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, कळलं का यांचा एकच आमदार का निवडून येतो ? केंद्र सरकार जनतेचे रक्षण करण्यात पूर्णतः असफल ठरलं, केंद्र सरकारचा राजीनामा मागायचा सोडून हा लोकांना बंदुका वाटा म्हणतोय. अशा टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Read also:
- “मनसे सारख्या टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा”
- “औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री लवकरच गुडन्युज देणार”; चंद्रकांत खैरे
- इतिहासात नोंद आहे, ही निवडणुक आम्हीच जिंकणार”
- ” रात्री गार्डनमध्ये कुणासोबत गुलुगुलु करता, हे आता सर्व कळणार” अजित पवारांची तरूणांना कोपरखळी
- “उद्या काय होणार , काय मिळणार? माझी चिंता करू नका”