मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणात ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यसभेची निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र यात कोणताही समजोता न झाल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ असल्याचं जाणकारांचं मत आहे.
राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर
विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला 2 तर आघाडीच्या तिन्ही पक्षाला प्रत्येकी एका जागेवर उमेदवार विजयी निवडणुन आणण्यास कोणतीही अडचण ठरणार नव्हती. मात्र दोन्ही बाजूंनी आपला तिसरा उमेदवार दिल्याने रंगत अजून वाढली आहे. भाजपने पियुष गोयल, अनिल बोंडे, आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढी़ याना उमेदवारी दिली आहे.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
महाविकास आघाडीतील शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने एक उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपला अतिरिक्त एक उमेदवार देण्याची संधी महाविकास आघाडीकडून मिळणार आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून भाजपला देण्यात आला आहे. मात्र भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे दोन, तर आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणुन येणार मात्र सहाव्या जागेसाठी चुरस बघायला मिळणार आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. तसेच या निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. तसेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीची तडजोड होणार त्याकडे लक्ष आहे. तसेच या निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार बाजी मारणार ते पण पाहाणं महत्वं ठरणार आहे.
Read also:
- “2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार
- “2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं
- “निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
- राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
- “फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?