मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मशिदीवरील भोंग्याबाबत कार्यकर्त्यांना पत्रक वाटण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात राज ठाकरे यांनी एक पत्र देखील प्रसिद्ध केले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या चेंबुर परिसरातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरूवात केली होती. तसेच मैनिसैनिकांकडून चेंबुरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स देखील लावण्यात आले. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..
याआधी देखील मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या आंदोलनामुळे मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे तेव्हा देखील मनसैनिक आक्रमक झालेले बघायला मिळाले. तसेच आता या घटनेनंतर राज ठाकरे याप्रकरणाबाबत काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
खंडोबाची शप्पत घेवून सांगतो, फडणवीस यांनीच…
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणून माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
त्याचबरोबर तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असा सज्जड दम देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे यांनी मागील काही राजकीय सभामधून मशिदीवरील भोंग्यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर राज्यात मनसेकडून आंदोलने देखील करण्यात आले. तसेच आज कार्यकर्त्यांना दिलेल्या सुचनांनतर पुन्हा एकदा ते प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळात येण्याची शक्यता आहे.
Read also:
- अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
- आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात
- राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
- “साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री
- “छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”