मुंबई : राज्यसभेची निवडणुक ही बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ हे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झाले आहेत. राज्यसभेची निवडणुक ही सहा जागेसाठी होत आहे, मात्र भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा, याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप यानिवडणुकीबाबत काय भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”
महाविकास आघाडीतील शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई यांचा समावेश आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने एक उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपला अतिरिक्त एक उमेदवार देण्याची संधी महाविकास आघाडीकडून मिळणार आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून भाजपला देण्यात आला आहे.
भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..
चंद्रकांत पाटलांनी या अगोदर महाविकास आघाडीला एक उमेदवार मागे घेण्यास सांगितले होते. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत सामंजस्यची भूमिका भाजप घेणार असं पाटलांनी स्पष्ट केले होते. तसे न झाल्यास विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजप अतिरिक्त उमेदवार देणार, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. तसेच या निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. तसेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीची तडजोड होणार त्याकडे लक्ष आहे. तसेच या निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार बाजी मारणार ते पण पाहाणं महत्वं ठरणार आहे.
Read also:
- राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
- अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
- आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात
- राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
- “साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री