पुणे : राज्यसभेची निवडणुक ही बिनविरोध होणार नसल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. दोन्ही बाजूच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमचे तिन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
“2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं
या निवडणुकीसाठी पुरेसं संख्यबळ त्यांच्याकडेही नाही. कॉमन मतांसाठी दोघेही प्रयत्न करतील. आमच्याकडे 30 मतं आहेत. 41.01 असा कोटा आलाय, तर अतिरिक्त 12 मतं आमच्याकडे आहेत. प्रेफरन्शियल व्होटिंगनं मतदान होतं. इतिहासात अनेक दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कुणाकडे तरी जास्त आणि कुणाकडे तरी कमी असतात. कमी मतं असलेला उमेदवारही यापूर्वी जिंकून आला आहे. कारण या पद्धतीत मताच्या एक दशांशापर्यंत मोजण्याची पद्धत असते. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकणार याबद्दल खात्री आहे. असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
“निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
आमचा सगळ्यांशी संपर्क झालाय. त्यामुळे वेगळी बैठक बोलावण्याची गरज नाही. प्रत्येकाशी आमचं बोलणं सुरु आहे. इतर पक्षाच्या उमेदवारांशी आम्ही संपर्कात नाही. ती आमची कार्यपद्धतीही नाही आणि त्याचा उपयोग नाही. प्रस्थापित पक्षाच्या आमदाराला आपल्या पक्षप्रतोदाला मत दाखवावं लागतं. त्यामुळे अधिकृत मतांशिवाय जी मतं आहेत, त्यावर सगळं गणित चालेल. असंही त्यांनी सांगितलं आहे.
राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे दोन, तर आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणुन येणार मात्र सहाव्या जागेसाठी चुरस बघायला मिळणार आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. तसेच या निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. तसेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीची तडजोड होणार त्याकडे लक्ष आहे. तसेच या निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार बाजी मारणार ते पण पाहाणं महत्वं ठरणार आहे.
Read also:
- ” रात्री गार्डनमध्ये कुणासोबत गुलुगुलु करता, हे आता सर्व कळणार” अजित पवारांची तरूणांना कोपरखळी
- “उद्या काय होणार , काय मिळणार? माझी चिंता करू नका”
- “वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा वेळ आता सुरू झाली”; राऊतांनी भाजपला ललकारलं
- राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
- “2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार