मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणात ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यसभेची निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र यात कोणताही समजोता न झाल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ असल्याचं जाणकारांचं मत आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा आता वेळ सुरू झालेली आहे. आता स्पष्ट चित्र झालं आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणुक आपण एकमेकांच्या सहमतीने लढवतो. कोणत्याही प्रकारे घोडेबाजाराला वाव राहु नये, यासाठी नेहमीच आम्ही अशा निवडणुकांमध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेते हे आज सकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांना भेटले. मात्र दोन्ही बाजू आपल्या भुमिकांवर ठाम आहेत. असंही ते म्हणाले.
राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर
भाजप त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि शिवसेनेचे संजय पवार देखील रिंगणात आहेत. त्यामुळे आता जी काय निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला सामारें जाण आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीला पुर्ण खात्री आहे की आमचा सहावा उमेदवार देखील अगदी सहज निवडून येईल, अशी आशा देखील राऊतांनी व्यक्त केली.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
दरम्यान, विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला 2 तर आघाडीच्या तिन्ही पक्षाला प्रत्येकी एका जागेवर उमेदवार विजयी निवडणुन आणण्यास कोणतीही अडचण ठरणार नव्हती. मात्र दोन्ही बाजूंनी आपला तिसरा उमेदवार दिल्याने रंगत अजून वाढली आहे. भाजपने पियुष गोयल, अनिल बोंडे, आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढी़ याना उमेदवारी दिली आहे.
Read also:
- राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
- “2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार
- “2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं
- “निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
- राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?