बीड : सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय ? पण माझी चिंता करू नका, उद्या काय होणार , काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. असं भाजप नेते पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यस्थिती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण देखील उपस्थित होते.
राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
ज्यांच्या नावातच शिव आणि जनतेच्या मनात ज्यांचं राज आहे अशा शिवराजसिंह चौहान यांचं मी स्वागत करते. सकाळपासून लोक तुमच्या प्रतिक्षेत आहे. तुमचं आमचं नातं मुंडे साहेबांपासून आहे. याठिकाणी तुम्ही मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला आला होता. त्याच ठिकाणी आज तुम्ही आला आहात. तुम्ही मध्यप्रदेशात जी किमया करून दाखवली आहे. जे इतर कोणत्याही राज्याला जमलं नाही. तुम्ही ओबीसी आरक्षण टिकवून धरलं. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा लाभो, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
“फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
गोपीनाथ मुंडे यांचं आज 8 वं पुण्यस्मरण आहे. मोदी सरकारलाही 8 वर्ष झाली आहेत. ज्याठिकाणी मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथेच अंत्यविधी करावा लागला. हा गोपीनाथ गड माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे. जे सकाळपासून तुमची वाट पाहत होते. असंही त्या म्हणाल्या.
राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर
गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. उसतोड मजूरासाठी, बीड जिल्हासाठी तसेच सामान्य माणसांसाठी त्यांचं जे स्वप्न होतं. ते आजही सत्तेत असताना मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. तसेच पंकजा मुंडे या देखील गोपीनाथ गडावर गेल्या होत्या. तर खासदार प्रितम मुंडे या गोपीनाथ मुंडे भाविक झाल्या होत्या.
Read also:
- “वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा वेळ आता सुरू झाली”; राऊतांनी भाजपला ललकारलं
- राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
- “2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार
- “2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं
- “निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत