औरंगाबाद : शिवसेनेचा मराठवाडा वर्धापनदिन 8 जून रोजी औरंगाबाद याठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे राजकीय सभा आयोजित केली आहे. ज्याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलिकडेच सभा झाली होती. त्याच मराठावाडा सांस्कृतिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेत मुख्यमंत्री दोन महत्वाच्या घोषणा करणार असल्याचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्राकांत खैरे यांनी सांगितलं आहे.
“2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार
गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव कऱण्यासाठी लढा आता पूर्णत्वास येतो आहे. या दोन्ही शहरांच्या नामकरणाबाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील जनतेला लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुडन्युज देतील , अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून नामंतराची ही मागणी पूर्ण होणार का ? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
“2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं
औरंगाबाद आणि उस्मानाबद शहाराच्या नामांतराची फाईल पूर्णत्वास गेली आहे. फाईलवर सही होऊन नामांतराची कधीही घोषणा होऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला कधीही गुडन्यूज देतील, असंही ते म्हणाले. त्यासाठी आज उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांनी तुळजापुर येथे जाऊन तुळजाभवानी मातेला साकडे घातले. त्यावेळी ते बोलत होते.
“निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून भाजपने औरंगजेबच्या कबरीवरून भाजप आणि मनसेने राज्य सरकारविरोधात रान पेटवलं आहे. औरंगजेबची कबर उद्धवस्त करू, असा इशारा दिल्यानंतर त्या कबरीला सरंक्षण देण्यात आलं. त्यावरून मनसेने राज्य सरकारवर जोरदार टिका केली. तसेच औरंगाबादमध्ये पाण्याच्या प्रश्नावरूनही भाजपने जल आक्रोश आंदोलन करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 जून रोजी होणाऱ्या सभेत यांचा कशाप्रकारे समाचार घेतात ते आता पहावं लागणार आहे.
Read also:
- इतिहासात नोंद आहे, ही निवडणुक आम्हीच जिंकणार”
- ” रात्री गार्डनमध्ये कुणासोबत गुलुगुलु करता, हे आता सर्व कळणार” अजित पवारांची तरूणांना कोपरखळी
- “उद्या काय होणार , काय मिळणार? माझी चिंता करू नका”
- “वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा वेळ आता सुरू झाली”; राऊतांनी भाजपला ललकारलं
- राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली