मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक ठिकाणी सक्तीने मास्क घालण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोकं वर काढू राहिलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह काही खबरदारीच्या सुचनाही दिल्या आहेत.
इतिहासात नोंद आहे, ही निवडणुक आम्हीच जिंकणार”
सहा जिल्हांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहेत. शुक्रवारी मुंबईत 763 नवे रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पण यावर कोणीही घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसचे गर्दीच्या ठिकाणांसह रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रूग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे.
” रात्री गार्डनमध्ये कुणासोबत गुलुगुलु करता, हे आता सर्व कळणार” अजित पवारांची तरूणांना कोपरखळी
कोविड-19 चाचण्यांची संख्या सध्याच्या आठ हजार चाचण्यांवरून 30,000 पेक्षा जास्त करावी. सध्या संसर्गाचे प्रमाण आठ टक्क्यांवर पोहोचले आहे. जो धोक्याच इशारा आहे. त्यामुळे पालिका अलर्टमोडवर आहे. अशातच नागरिकांनीही आपली काळजी घेण महत्वाचं आहे.
दरम्यान, राज्यातील दैनंदिन रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील दैनंदिन कोविड रूग्णसंख्या 700 च्या वर पोहोचली आहे. मुंबईती गोरेगाव परिसरात रूग्णसंख्या वाढीचा दर सार्वधिक असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रिय रूग्णांची नोंद तर रायगडमध्ये 108, ठाणे 658 आणि पुण्यात 409 सक्रीय रूग्ण आहेत.
Read also:
- “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
- संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
- “चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”
- “मनसे सारख्या टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा”
- “औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री लवकरच गुडन्युज देणार”; चंद्रकांत खैरे