पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुढील 25 वर्ष हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य केले. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उस्मानाबाद येथील तुळजाभवानीकडे साकडं घातलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पुढचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचाच असणार असा दावा केला आहे.
” रात्री गार्डनमध्ये कुणासोबत गुलुगुलु करता, हे आता सर्व कळणार” अजित पवारांची तरूणांना कोपरखळी
धनंजय मुंडे आज आपल्या मतदार संघ असलेल्या कोरेगावाच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी ते आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी थांबले होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचाच असल्याचा दावा केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
“उद्या काय होणार , काय मिळणार? माझी चिंता करू नका”
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार, असे चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर त्यांनाच कदाचित घोडेबाजार सरू करायचा असेल आणि त्यासाठीच ही निवडणुक लादली आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात सर्वदूर सगळ्यांना वाटतेय. राज्यसभेच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार होते असे एकंदरीत दिसत असल्याचंही ते म्हणालेत.
“वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा वेळ आता सुरू झाली”; राऊतांनी भाजपला ललकारलं
दरम्यान, मनसे नेते गजानन काळे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या दाव्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाताहेत तर शिवसेनेचे नेते संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय मग तुमची धूनी भांडी करायची का ? असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. तसेच हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळा सहउद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
- “चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”
- “मनसे सारख्या टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा”
- “औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री लवकरच गुडन्युज देणार”; चंद्रकांत खैरे
- इतिहासात नोंद आहे, ही निवडणुक आम्हीच जिंकणार”