पुणे : शेतकरी व साखर उद्योगाला मार्गदर्शन करण्यासाठी गडकरी साहेबांच्या सहकार्याने यंदा विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल, असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आशा व्यक्त केली. साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे येथे राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये ते बोलत होते.
“औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री लवकरच गुडन्युज देणार”; चंद्रकांत खैरे
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उत्पादनात चांगले बेणं कसं देता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. यासाठी आपण काही निर्णय घेतले. ऊसाच्या नवीन जाती तयार करण्यासाठी पावलं टाकली जातात. यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज आहे. मराठवाडामध्ये ऊसाचा क्षेत्र वाढते. म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तेथे एक शाखा काढावी असा एक आग्रह आपल्या सहकाऱ्यांचा होता. त्यासाठी आपण धोरणात्मक निर्णय घेतला. जालन्याजवळ पाथरवाला भागात आपण खरेदी केली. ती जमीन तयार केली. गेल्या वर्षी ११ एकर ऊस तिथे तयार केला. यावर्षी ३५ एकर ऊसाची त्या ठिकाणी लागवड केली. पाण्याची पाइपलाइन आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होत आल्या आहेत. एक अतिशय उत्तम केंद्र जालन्याजवळ सुरू करत आहोत. आज आपण या ठिकाणी आहोत त्या मांजरीला ९० एकर जमीन आहे. ती शासनाकडून ३० वर्षांच्या करार करून घेतली आहे. या जमिनीमध्ये पाइपलाइनचे काम सुरू आहे. तेथील डेव्हलमेंट पूर्ण झाली. विदर्भात गोसीखुर्द धरणामुळे ओलिताखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वादळ व गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे ऊस हे अधिक खात्रीचे पीक असल्याने ऊस क्षेत्रात राज्याच्या इतर भागासह विदर्भात देखील वाढ होईल.
इतिहासात नोंद आहे, ही निवडणुक आम्हीच जिंकणार”
शेतकरी व साखर उद्योगाला मार्गदर्शन करण्यासाठी गडकरी साहेबांच्या सहकार्याने यंदा विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ऊस उत्पादन कमी येण्याची कारणे आणि उपाययोजना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हंगाम व जात निहाय ऊस लागण आणि पक्वतेनुसार तोडणी कार्यक्रम, लागण नोंदी व तोडणी कार्यक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऊस बेणे बदल, जमीन सुपिकता टिकवून उत्पादन घेणे, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, समस्यायुक्त जमीन सुधारणा, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, ठिबक सिंचन, खोडवा पीक व्यवस्थापन या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. आणखी एका गोष्टीची चर्चा करणे आवश्यक आहे ते म्हणजे ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरण. यंदाचा वर्षी आपल्याला त्याचा परिणाम जाणवला. या परिषदेच्या निमित्ताने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तिका आपल्या साखर उद्योगाच्या विविध विभागांच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरू शकेल, असा मला विश्वास आहे. देशाचा साखर व्यवसाय एका विशिष्ट वळणावर आलेला आहे.
” रात्री गार्डनमध्ये कुणासोबत गुलुगुलु करता, हे आता सर्व कळणार” अजित पवारांची तरूणांना कोपरखळी
साखर उद्योगाचे परिस्थितीनुसार संदर्भ बदलत आहेत व त्या अनुषंगाने नवीन आव्हाने समोर येत आहेत. या आव्हानांमध्ये आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण, भारतासारखी भव्य बाजारपेठ या बाबी नजरेसमोर ठेवून आपणास यशस्वी व्हायचे आहे. प्रामुख्याने दर एकरी ऊसाचे उत्पादन वाढविणे, साखरेचा उतारा वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, वीज, रसायने, सुटे भाग यांच्या खर्चावर नियंत्रण तसेच साखरेचा दर्जा वाढवून जागतिक बाजारपेठेमध्ये देशाचे स्थान कायम राखणे, साखर निर्मितीमध्ये सातत्य राखणे, साखरेशिवाय दर्जेदार व किफायतशीर उपपदार्थांची निर्मिती हे मला महत्त्वाचे वाटते. म्हणून या सर्व प्रश्नांकडे आपण लक्ष देयची गरज आहे. या धंद्यामध्ये ज्या कमतरता आहे त्या दूर करून आपला जो मूळ ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याच्या जीवनात स्थिरता कशी येईल, त्याचा संसार कसा फुलेल, या देशामध्ये कृषी उद्योगात योगदान देणारी कारखानदारी म्हणून महाराष्ट्राची या कारखान्याची चर्चा होईल, त्याची नोंद इतिहासात होईल. या दृष्टीने आपल्याला काळजी घेयची आहे. ती घेण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य मिळेल अंसही ते म्हणाले.
Read also:
- “राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
- “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
- संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
- “चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”
- “मनसे सारख्या टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा”