मुंबई : ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. त्याठिकाणी नोकऱ्या गमवण्याची वेळ मोदी सरकार सत्तेत आल्यामुळे झाले आहे. मागील आठ वर्षात तरूणांनाही कोणतीही नोकरीची संधी या सरकारने निर्माण केली नाही. तसेच देशाचा जीडीपी फक्त दोन लोकांमुळे वाढतोय. सर्वसामान्यांचं हाल होत आहे. असं म्हणत काॅंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
“चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”
ज्यावेळी देशावर आर्थिक संकंट येतोय. त्यावेळी मोदी सरकारकडून जातीपातीचं राजकारण समोर आणला जातो. त्यामुळे जेव्हापासून ते सत्तेत आलं आहे, तेव्हापासून जातीपातीचं राजकारणही वाढलं आहे. यांच्याविरोधात आता बोलणंच नाही तर त्याचा विरोध करणंही तितकाचं महत्वाचं आहे. नरेंद्र मोदी यांच्याकाळात महागाईचा चटका हा सर्वसामान्यांना बसला आहे. त्यामुळे 9 जून ते 14 जून या दरम्यान आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
“मनसे सारख्या टुकार पक्षाचा एकही आमदार निवडून आणताना जनतेने विचार करावा”
देशातील आर्थिक सत्ता ही फक्त देशातील दोन व्यक्तींकडे आहे. त्या दोन व्यक्ती एका रात्रीत श्रीमंत होत आहेत. परंतु गरीब माणूस अजूनही गरीब होत चालला आहे. जे लोक बोलू शकत नाहीत त्यांना आधार देऊन एक नवी उमेद घेऊन येत्या काही काळात काॅंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. असंही त्या म्हणाल्या.
“औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री लवकरच गुडन्युज देणार”; चंद्रकांत खैरे
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारला अलिकडेच 8 वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र इंधन दरवाढ, भाववाढ, महागाई यामुळे सर्वसामान्य माणुस मेटाकुटीस येऊन पोहचला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमंती गगणाला भिडल्या आहेत. यावर फक्त मलम पट्टी करून लोकांना भावनिक मुद्दा तसेच धार्मिक मुद्यांमध्ये गुंतवणून फसवणुकीचा प्रकार सध्या चालला आहे.
Read also:
- ” राज्याचे मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतंय”; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
- “राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
- “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
- संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?