नाशिक : नाशिकमध्ये आज महानुभाव पंथाचे संमेलन आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, आमदार, खासदार व अनेक संत महंत उपस्थित होते. या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदार उपस्थित होता. कार्यक्रमावेळी जोरदार पाऊस सुरू असतानाही या कार्यक्रमाला लोक उपस्थित होते.
“भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला
भाजपचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या वेळी माझ्याकडे मंत्री म्हणुन खास जबाबदारी दिलेली होती. आजची सभेची विराट गर्दी पाहूण मला कुंभमेळ्याची आठवण आली. कुंभमेळा नंतर आज मी हा मिनी कुंभमेळा भरलेला पाहायला मिळत आहे, असं मंंत्री गिरीश महाजन म्हणाले.
“शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
मला सांगितलं होतं मोठ्या संख्येने जनसमुदाय येणार आहे. पण मला वाटलं आम्ही नेते सांगत असतो 2 लाख सांगितले की 50 हजार असतात. 1 लाख सांगितले की 25 हजार असतात. पण आज त्यांनी जो आकडा सांगितला त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आपण उपस्थित आहात, असं महाजन म्हणाले.
“कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
तर या कार्यक्रमाला फडणवीस, महाजन व खडसे हे नेते उपस्थित होते. भाजपमधुन राष्ट्रावादीत गेलेले आमदार एकनाथ खडसे मंचावर एकटे पडल्याचं चित्र दिसत होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन हे एकत्र आले होते तर त्याच मंचावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे एकटे पडले होते.
Read also
- “शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
- “गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
- “आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
- सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं